Saturday, December 31, 2011

बांगड्या

आज खूप दिवसांनी मी माझ closet  लावायला घेतल.  अचानक वरच्या खणात ठेवलेला एक बांगड्याचा बॉक्स हाती लागला. त्यात अगदी सगळ्या रंगांच्या, पद्धतिच्या, आणि विविध size च्या बांगड्या आहेत. तो बॉक्स पाहून मी हरखले. मन अगदी  आठवणीच्या राज्यात  भरकटत गेले.

त्या बॉक्स मधे  अगदी माझ्या बाळ- लेणी असल्यापासून ते आता- आता पर्यन्त वापरत असलेल्या सगळ्या बांगड्या आहेत. जणू काही त्यातली प्रत्येक बांगडी मला काही सांगू  पाहत होती. कधी शाळेतल  स्नेहसम्मेलनातला कुठलासा  नाच तर कधी कुठल्या तरी कार्यक्रमला  केलेली एखादी  नाटुकली. कधी घरच किंवा आम्हा मैत्रिणीच हळदी कुंकू तर  कधी अवाजवी केलेला बांगडी साठीचा  हट्ट.  कधी स्वतःच पैसे जमवून एखाद्या जत्रेतुन आणलेल्या तर  कधी कुठल्या तरी ताईच्या लग्नात भरलेल्या. कधी आत्या-मावशी किंवा काकूला मुद्दामहून आणायला सांगितलेल्या तर कधी त्यांनीच  प्रेमाने एखाद्या देवस्थानाहून किंवा नव्या गावाहून आणलेल्या. आपले लाड पूरवणा-यांच्या आठवणीत मन अगदी रमून गेलं.

अचानक एक प्रसंग आठवला. मी घरी हट्ट करीत होते - नव्या बांगडीसाठी. colany मधे कासार आला होता. (तस हे काही नव नव्हत आमच्या घराला, कॉलनीला  किंवा अगदी रोज येणा-या त्या कासारालाही.)  रडून भोकाड पसरून सगळे प्रकार केलेले. पण घरातले कोणीच तयार  होईनात नव्या बांगडीसाठी.  तेव्हाच आजीने एक रसरशीत दणका घातला पाठीत आणि तोंडातल्या तोंडात बडबडत राहिली. काहीस असं --' कुठल्या जन्मताल्या हिच्या बांगड्याची हौस राहिलीय काय माहित. रोज बांगडी घेतली तरी हाच तमाशा कासार दिसल्यावर'. शेवटी आजोबानी हतबल होउन हात पकडला आणि  म्हणाले चल घेऊ हव्या त्या. पण उगाच दंगा नको. कासार  कॉलनी मधून बाहेरच्या रस्त्याला लागलेला. तिथे काही रस्त्यावर राहणा-या  मुली त्या कासाराकडे भुकेल्या नजरेने पाहत होत्या. मला काय झाल काय माहित पण आजोबाना मात्र मी promise दिल.  आता मी कधी कधी बांगड्यासाठी  हट्ट नाही करणार. हो! पण त्यावेळी मात्र घेतल्या होत्या नव्या बांगड्या.
त्या नंतर माझा तो हट्ट सुटला. कदाचित त्या केविल वाण्या चेह-याच्या मुली दिसतील म्हणून. किंवा माझ्या कड़े त्यांना बांगड्या देण्याच औदार्य नव्हत म्हणून. ह्याच नेमक उत्तर मला काही देता येणार नाही.  त्या नंतर कधी मी बांगड्या साठी हट्ट केल्याच किमान मला तरी स्मरत नाही, एवढ नक्की. हे सगळ आठवून माझ मला हसूच फुटल.

तो बॉक्स मी बंद करणार तोच, त्यातल्य़ा आजीच्या दोन हिरव्या बांगड्या आणि मोत्याचे तोड़े दृष्टीस पडले. आजोबा जाताना च्या वेळेस तिने काढून ठेवलेले . आणि त्यातच अजून  दोन लाल बांगड्या. शेवटला हॉस्पिटल मधे असताना आजीनेच काढून माझ्या हाती दिलेल्या. मी त्या का आणि कधी त्या बॉक्स मधे ठेवल्या - ह्या प्रश्नाला मी स्वत:  किंबहुना  माझ्या डोळ्यात उभी राहिलेली आसवेही  निरुत्तर!











Tuesday, November 8, 2011

"Adieu"

  21st august, 2011 - one more unforgettable day in my life. The day I caught flight for my good or just to leave everything behind and move on (?).With mixed of emotions I had stepped in to Mumbai international airport. Catching flight for US was not at all new nor was M.K.G. (Mumbai-Kurla Gang) gathering along with so many my other family members at airport to give me sendoff. Yet, this time everything was different. I was leaving everything behind and getting on to some other life. I was not going to return back after a month but to come back for a month's vacation in an year. I was in full of tears and so was all closed once at airport. I never thought I will actually cry so much after my teen age had crossed nor did I thought of becoming so much emotional that I could not even move my feet.
    This time I was praying from bottom of my heart for flight delay or something should happened to postpone flight for a day at least. Alas! Nothing changed. Not even after I boarded one. My every flight journey gave me inadvertent experiences. Especially,flight delay incidences. Couple of times I had even got down from flights and stayed back at airport. This time nothing abrupt had happened and I finally boarded the flight. My big B was yet under impression that airline had actually missed my name and hence everything was going so smooth and on time. Not sure why, but exactly when I wanted my flight to be delayed for few hours and  I wanted to spend some more time with loved once,nothing abrupt happened to change anything on those lines.
     I stepped into flight with soggy eyes, snarl voice and heavy heart. The moment flight started taking off, I simply gone to every moment of my past. I was moving in flashback more than the light's speed .
Starting from my school days, college days and the first day of my job everything was still so clear. First time outside home, lovely roomies, new freinds... First onsite, so much enthusiasm, so many wishes from friends and demands from near once to get something or other for them. Huge messes, warm get togethers...
Every weekend Mumbai-Pune hoppings. Starting from Indrayani train, `Hardik` travels (one of my friend who had car and we all used to jump in his car for weekend travels) to Shivneri journeys. Every weekend grand welcoming from big B’s, friends and sweet Sis. Drowsy Monday early mornings and every weekend drop till bus stop or railway station to push me to Pune by my friends and big B.  Every Monday answering same question to mumbai-pune group why my big B comes to drop me, otherwise how I would have been kicked out of my job due to every Monday off stories. Few abrupt Monday’s with sudden calls to manager- for taking off for no reason or just to get rid of weekend hangover.
Over the period of time so many assortments had formed. So many distinct activities with them…office events, coffee breaks, carom, resting at recreation room...Endless weekends and various debates. Long treks, sudden picnics,impulsive plans for weekends. Weird activities, some foolish jerks and touchy friends. Lot of messages from lovely hearts `don’t dare to forget`. So many send off parties… Everything is priceless! Now even I myself is startled that I made decision to leave such beloved once for couple of years! Everything seems to be surprising...
   I'm really lucky to have something that makes me saying good-bye to all of you so difficult.  
Not sure, what all I left behind or what I had actually clutched but for sure I’ll be missing all that…all of you friends, my beloved family and all my DVCI colleagues…


P.S. Thanks for giving me happy trails. I'm proud to have you all in my life, helping me turning all my blue trails in to happy once and making me riding them in counting way! Miss you all untill we meet again.





Sunday, August 28, 2011

प्रमुख अध्यक्षा?

   ऑगस्ट महिन्यात मी कोकणात माझ्या सगळ्या हृद्य नातेवायीकांना भेटण्यास गेले होते.  योगा-योगाने टिळक पुण्यतिथीही  होती, म्हणून  मावशीच्या शाळेला  भेट देण्याचा योगही चांगला होता. माझ्या मावशी - मामांच्या शाळा म्हणजे त्यांच्या आणि आमच्या आयुष्यातला तसा अविभाजक घटक. त्यामुळे आम्ही कोणीही कोकणात गेलो की नातेवायीकांना ज्या तन्मयतेने किंवा आदरापोटी  आम्ही भेटतो त्याहीपेक्षा किंबहुना जास्तच हृद्य् पोटी ह्या शाळांना भेट देतो .      
   मावशीची शाळा अगदी छोटी. तिथे एका छोट्या hall मध्ये पाचवी ते दहावीची मुले रोज प्रार्थनेला बसू  शकतात एवढी कमी पटसंख्या असणारी. सगळ्या कार्यक्रमांना अख्खी शाळा एकत्र येते. सगळा शिक्षक वर्ग पालकांसारखा मुलांसाठी राबतो. अशा ह्या शाळेतली एक-एक नवी गोष्ट मावशी मला अगदी घरातल्या गोष्टीसारखी आपुलकीने update करत असते. ह्या शाळेतले सगळे शिक्षकवर्ग मला आपली भाचीच असल्यासारखा वागवतो. तर अशा शाळेतल्या कार्यक्रमांना जाणे म्हणजे माझ्यासाठी एक पर्वणीच! तिथे मला मुलांमध्ये बसून कार्यक्रम पाहण्यापासून ते त्यांना शिकवण्यापर्यंतचे सगळे हक्क मिळतात. तर थोडक्यात ही अगदी घरची शाळा!
   शाळा सोडून खूप वर्ष झाली तरीही शाळेतल्या कार्यक्रमांच मला आजही खूप अप्रूप वाटतं. असो, तर अश्या ह्या शाळेत मी टिळक पुण्यतिथी साजरी करायला गेले होते. म्हणजे - शाळेतला कार्यक्रम पाहायला आणि सगळ्यांना भेटायला. कार्यक्रम जरी लहान शाळेतला असला तरीही तयारी जय्यत  होती. अगदी निवेदन करणाऱ्या सरांपासून ते भाषण करणाऱ्या मुलांपर्यंत सगळच pre- planned! कार्यक्रमाला सुरुवात होणार आणि त्याच वेळेस  अगदी प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित न राहण्याची घंटा वाजवली. झाल, आता पाहुणे कोणाला बनवणार ह्यावर सगळ्या शिक्षकांचं अगदी एकमतच  झाल - आणि अचानक शाळा-भेटीसाठी आलेल्या पाहुण्यांची "प्रमुख अध्यक्षा" म्हणून निवड झाली. लगेचच कार्यक्रम नियोजित करणाऱ्या शिक्षकांनी मला माझे roles समजावून दिले. फक्त कार्यक्रम संपल्यावर मुलांना दोन गोड शब्द सांगावेत अशी खूपच गोड आग्रहाची विनंतीही त्यांनी मुलांसमोर केली. झालं, तर अशा प्रकारे, मी अध्यक्षा म्हणून प्रमुख खुर्चीवर विराजमान झाले.   
   शाळेत असताना मला कार्यक्रमांना येणाऱ्या अध्यक्षांच खूपच नवल वाटे. ते कोणी खूपच गुणी सज्जन असल्यासारखं वाटे. ह्या पदाला यायचं म्हणजे खूप मेहनत करून यश संपादन कराव लागत वगैरे वगैरे ...खूपच काही कल्पना होत्या-  त्या सगळ्या कल्पनांना  धुळीला मिळायला फक्त मला त्या खुर्चीवर बसण्याचा एक निमिष खूप ठरला.  मला वाटत होत कदाचित आज मी पाठी बसून मुलांची आणि अध्यक्षांची भाषण ऐकणार, म्हणजे किमान आज तरी माझ्या पोटात गोळा नाही येणार. पण झालं उलटच. आता तर माझ्या पोटात त्या मुलांपेक्षाही मोठा गोळा येत होता. किमान भाषण देणाऱ्या मुलाला  भाषण होईपर्यंतच 'कसतरी' वाटत राहत. पण मला मात्र संपूर्ण कार्यक्रम आणि त्यानंतरही! अगदी खुर्चीवर बसल्यापासून ते अगदी मी "उपदेशपर  शब्द   सांगेपर्यंत" माझी सगळी हालचाल मुल टिपत होती. त्यातून निवेदकांनी माझं जरा जास्तच कौतुक करून मुलांसाठी मला मोठ बनवलं होत. त्यामुळे मी जरी कोणत्या विद्यार्थ्याशी हसले तरी आजूबाजूची सगळीच मुल त्या मुलाशी कुजबुजायची.  अशा ह्या अवस्थेत विद्यार्थ्यांची भाषण ऐकताना मीच कितीदा तरी पाणी प्यायले. त्यातून मला चांगल्या भाषण करण्याऱ्या मुलाचं कौतुक त्यांच्या नावानिशी करण कर्तव्यपर होत. अशा ह्या अध्यक्षा, college मध्ये बसून जरी notes काढायला विसरल्या असल्या तरी आता मात्र सगळं अगदी आत्मीयतेने टिपत होत्या. सगळ्या मुलांचा समज - ह्या आपला number काढणार  आणि मला मात्र सगळेच अस्खलित बोलत असल्याचा भास. अगदी रणांगणात उतरल्यावर अर्जुनाची अवस्था काय झाली  असेल ह्याची प्रचीती  तेव्हा आली. म्हणता म्हणता मुलांची भाषणे संपली आणि अध्यक्षांच्या दोन शब्दांसाठी 'नम्र विंनती' झाली. अध्यक्षा उठता क्षणी टाळ्यांच कडकडाट झाला. सगळ्या मुलांचे कान माझ्या तोंडून कसले उपदेशपर डोस निघताहेत ह्याकडे, अर्थात काही वात्रट मुलांचे ' मी असा काय डोस देणार? ह्याकडे! ' मला अशा वात्रट मुलांचाच वर्ग नेहमी मोठा वाटतो. त्यामुळे अगदी भीतीपोटी मी सुरुवातीलाच त्यांना साकड घातल. " मी अगदी तुमाच्यातलीच एक विद्यार्थी आहे.पाठी बसून दंगा करणारी. वात्रटपणे चेष्टा करणारी. शाळेत असताना कितीदा तरी बाकावर उभी राहणारी. तेव्हा माझ्या विद्यार्थी मित्र- मैत्रीणीनो, माझं जर काही चुकलच तर मला सांभाळून घ्या." मग मुलांना काय झालं काय माहीत सगळे अगदी शांत बसून ऐकायला लागले. मी त्यांना जे काही सांगत होते ते अगदी घरातली ताईच सांगतेय की काय ह्या अविर्भावात सगळे माना डोलवत ऐकत होते. मलाही अगदी मी त्यांचाशी गप्पा मारतेय असाच वाटू लागल. मग २ मिनिटांची २० मिनिटे कशी झाली हे माझं मलाच कळलं नाही.
   गप्पांच्या ओघात मी परत शाळेशी एकरूप झाले...शाळेतले सगळे आदर्श पुन्हा एकदा लक्ख उभे राहिले. ज्यांमुळे मी गुणी विद्यार्थी  बनले, एक उत्तम माणूस म्हणून वाटचाल करण्याचे निश्चय बांधले ते सगळेच मार्गदर्शक मला टिळक पुण्यतिथी निमित्ताने पुनच्श भेटले - फक्त ह्यावेळी ते अध्यक्षांच्या रुपात बोलत होते!

Wednesday, February 23, 2011

वा! गुरु

 म्हटलं तर phillosophical आणि म्हटलं तर एक वेगळी अनुभूति म्हणून "वा! गुरु"ची category ठरवता येईल.डॉ.फणसळकरांची कथा ही "Tuesdays With Maurie" ह्या कादंबरीवर आधारीत आहे.
 एक दिलखुलास जगणारा आणि नेहमीच खिलाडू वृत्तीने जगण्याची शिकवणी देणारा प्रोफेसर (डॉ.दिलीप प्रभावळकर) जेव्हा Motor Neuron Disease (MND) ने खंगू लागतो तेव्हा त्याची जीवानावरची उक्तट दृष्टी अधिकच रंगू लगते.
तशातच अतिशय दुर्मिळ आजाराने व्यापलेले म्हणून त्यांची मुलाखत एक TV channel वाले घेतात आणि विद्याधर पै(अतुल परचुरे) नावाचा त्यांचा एक जुना शिष्य ही मुलाखत channel scanning करताना पाहतो.ती पाहत असताना त्याला एक शिष्य म्हणून अतिशय प्रेमळ शिक्षकाची दया तर येतेच पण त्याना भेटण्याचा ध्यासाही लागतो. 
 विद्याधर हे एक advertising agency मधे काम करणार अतिशय busy व्यक्तिमत्त्व. अगदी तुम्हा आम्हाला represent करणारं.ज्याना आयुष्यात खूप काही करायचय
आणि नेमक काम नावाखाली सगळ करताना सुख,प्रेम आणि आयुष्यातल्या अगदी महत्वाच्या अशा किन्तु पैशात किंवा तत्सम materilised यश मोजण्याच्या मापात न बसण्याऱ्या घटना सहजतेने विसरणारा.अगदी स्वत:च लग्नही ह्या गडबडीत postpone करणारा.
त्याच्या दैनंदित कार्यक्रमात काडीचीही ऊसंती नसल्याने आपल्या आवडीच्या गुरुला भेटण म्हणजे कुठला तरी वेळ काढण ह्या गणिता पल्याड  कदाचित पाहूही न शकणाऱ्या व्यक्तितला जेव्हा विद्यार्थी जागा होतो तेव्हा मात्र  गुरुप्रेमापोटी एकदा का होइना - उशीरा का  होइना पण आपण त्याना
भेटण हे जास्त महत्वाच आहे,हे पटल्यावर विद्याधर आपल्या गुरु-भेटीस निघतो.अगदी सगळ काम टाकून!त्या भेटी नंतर त्याचा एक नवा प्रवास आणि आपलाही त्याच्या गुरुंसोबत. 
 मग हा गुरु प्रसंगी त्याला सुख पहायला शिकवतो तर कधी सुख द्यायला.प्रेम पहायला तर कधी अनुभवायला.ह्या सगळ्या प्रवासात गुरु आपल्याला अतिशय सोप्या प्रसंगातून माणसाच क्षणभंगुर आयुष्य अनुभवायला लावतो.एकाच खुर्चीत बसून जणू आपण संपूर्ण प्रवास पूर्ण करतो.ह्या प्रवासात कधी तो बालपण ऊधळतो;
तर कधी यौवनात नाचवतो.तरीही म्हातारपण सुखी असण्याची आस धरवतो."धरत म्हटल तर धरू लागत म्हातारपण..." ही पाडगवाकरांची कविता अगदी योग्य तर्हेने वापरली आहे.पुन्हा एकदा रंगाची उधळण कशी होऊ शकते आणि ती कशी मोहक असू शकते ह्याचा प्रत्यक्ष अनुभव गुरु आपल्यासमोर आणतात.    
  मानवाच्या अगदी लहानपणापासून ते म्हातारापणापर्यंत सगळ्यात महत्वाचा टप्पा कुठला तर तो मधला - कारण त्या टप्प्याला ही दोन्ही टोक सावारायची असतात.हा एक सुंदर दृष्टिकोन हा प्रवास पहाताना होतो.सगळ्यात important म्हणजे आपण जगण्यासाठी चालवलेली धडपड ही एक निव्वळ ते जगण सुकर करण्यासाठीची आहे हे विसरता येत नाही- हे गुरु आपल्या डोक्यात अगदी पक्क बसवतात.
 गुरुपत्नी(गिरिजा काट्दरे) तर अगदी मोहावून टाकतात.त्यांची आहे ते स्विकारण्याची प्रगल्ब्धता आणि प्रात्यक्षिक सहजता तर हेल्खावून सोडते.एक सहचारिणी आपल्या सख्याचा दुर्गम प्रवास किती सोपा करू शकते ह्याच हे जिवंत उदाहरण आहे.तिचा role अगदी मोजकाच पण वाखाण्यासारखा  आहे. प्रसंगी गुरुपत्नी आणि प्रेयसी (पूर्णिमा तळवलकर) ह्याना stage वर कमी वाव मिळतो असं वाटत खर;पण नंतर लक्षात येत - जर एवढा मोठा संदेश अगदी मोजक्या घडीत बसवयाचा तर कुठे तरी काट छाट आलीच.महत्वाची बाब म्हणजे ह्या दोन्ही स्त्री व्यक्तिरेख्नावर अन्याय होत नाही.त्यांच्या भोवती खूप कथा अवलंबून राहते.
 सारीच पात्र आपली व्यक्तिरेखा धरून शेवट पर्यंत आपल्याला खिळवून ठेवतात.वेशभूषा,रंगभूषा आणि प्रकाशयोजनाही अनुरूप झाली आहे.चपखल ठिकाणी वापरलेली जुनी गाणी आणि योग्य चीज़ भावनाविवश करते.नाटक पाहून निघताना थोड़ी आसवे जशी डोळ्यात तरळतात तशीच कुठेतरी सृष्टीच चक्र वेगळ्या पद्धतीने पाहण्याची दृष्टिही देतात.मला वाटत ह्यातच खर नाटकाच श्रेय सामावल आहे.
 एक नवा प्रयोग म्हणून हे नाटक पहायला आणि आयुष्याचा एक नवा वर्ग अनुभवण्यासाठी  तिकीट काढायला काहीच हरकत नाही.  

  

Monday, January 24, 2011

One musical life

After long journey of 88 years to known world Bharatratna- Pt. Bhimsen Joshi bid adieu to all of us.

A very humble and determine person who had ran away from home in pursuit of music while he was kid. He did a long journey from south to north and even begged in train journey for survival. Finally the kid was destined to meet Sawai Gandharva as his “Guru” and his family agreed to give him known education in music- which turned him to Pandit. His true search for his passion led him to be an expert in hindusthani classical music. The magic in his voice turned everyone. He always experimented with music so that common man feels magic of it. The only quest for his life was getting and giving musical happiness reached the Summit. No wonder he was rewarded with padmavibhushana, BhartaRatna and many more grateful honours.


The most astonishing part of him was – he never considered himself above any other human being. We cannot find any of his ghastly incidence with any music show coordinator nor with any of his co-artist. Many a time he did music shows for charity though he would require money for his survival. He always made sure; his co-artists would be paid for their endurance although he might have to go empty hands from particular musical show. His simple living and caring character had always put him on pinnacle. His musical expedition will always be remembered and honored. All music lovers will always be proud to have such melodious devotee.

Today was an end of a great human being who did a long quest for musical happiness.
Panditaji’s soul may rest in peace.

Find more about Pt. Bhimsen Joshi at :
http://en.wikipedia.org/wiki/Bhimsen_Joshi

Thursday, January 20, 2011

Happy New Year :)

Although be-lated - "happy new year to all of you". May this year brings lots of happiness and good health to you. You may have nice resolutions and at least this year you  follow them meticulously.

I am not an exception to one of you, who makes resolution list and tries to adhere till the time one has fervor (or fever) of resolutions.
Yet, I havn't even given up making up one. The only challenge I face is "what should be there on list?"
After around a month I could figure out I should have a bucket list which will help me to improve on most other fronts. Things we normally circumvent in being race of careerist and materialistic.
What will I actually count at the age of fifty, when I am settled with some secure amount, home or may be with kids and may regret upon few things should have been done in my lifetime or will sigh for -- must be on my list, making lifetime pleasant.
Well, this May not be for a year but for time I attain that age :)